कोकणातील शेतीमधील प्रमुख पीक म्हणजे तांदूळ. जवळपास 99% लोक तांदूळ हे पीक घेऊन भात शेती करतात. खूप पाऊस असल्याकारणाने या भागात भातशेती केली जाते. जवळपास दसऱ्यानंतर पीक कापणीला येईल अशा प्रकारची तांदळाची बियाणे वापरून येथील शेतकरी भात करतो. तांदुळासोबतच मिळणारे गवत हे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न या शेतीतून त्याला भागवता येतो.
